गुनाल पानी
सकाळी ५ ला उठलो(शिटी ही रोजच वाजत असल्याने सारखा उल्लेख करायचं कारण नाही). त्यादिवशी आम्हाला कुठे व्यायाम वगेरे नव्हता तर होती बाकी काम. सगळ आवरून मी,प्रसाद,मंदार,गौरव ने टेंट साफ केला(मी आणि मंदारने चलाखीने गुजराती बांधवाना कामाला लावले, रोज आमच्यातलेच कुणीतरी हे काम करत असल्याने मंदारने त्यांना कामाला लावायचे ठरवले होते आणि ते केलेच). rucksack भरून तयार होतीच. आदल्या दिवशी वजन उचलल्यावर मला ओके वाटलेलं. पण ताट, वाटी,भांड हे नाश्ता करून त्यात टाकल्यावर अचानक ती फारच जड वाटायला लागली आणि आता सामान कमी करायची सोय नव्हती कारण माझ्या bags गोडाऊन मध्ये जमा होत्या आणि परत येईपर्यत काही मिळणार नव्हत्या. जन्मताच मला नीट नेटकेपणा नसल्याने मे सामान त्यात व्यवस्थित भरले नव्हते असे मंदारने त्याचे मत व्यक्त केले. मंदारचे त्याबाबतीत खूप कौतुक करावेसे वाटते की हा एखाद्या मुलीला लाज वाटेल इतका टापटीप, नीटनेटका राहतो. वस्तू व्यवस्थितपणे सांभाळणे आणि काळजी घेणे ह्यात आमच्या कुणापेक्षाही तो सरस होता. मग मंदार ने माझ सामान लावायला मला मदत केली(अडला हरी म्हणून विनवण्या केल्यावर पट्ट्या तयार झाला). त्याने सामान लावले खरे नीट पण तरीही मला हायस काही वाटल नाही उचलून. मी ठरवल(मनात शिवी हासडून. काय ते सांगत नाही. बाई माणस पण वाचतात हो). ***** काही झाल तरी या वजनासकट सारपास पूर्ण करायचाच. कुणाची मदत घायची नाही, काय वाट्टेल ते होऊदे(ह्याला काही जण माज म्हणतात). मग बाहेर आल्यावर आम्ही नाश्ता केला. त्या दिवशी आम्हाला ब्रेड बटर आणि जॅम ब्रेड असे आपल्याला हवे तितके slices मुभा होती. आणि तेच अन्न दुपारच्या जेवणाला पण डब्यात भरून न्यायचं होत. डबा-बाटली भरली. मग आम्ही बेस कॅम्प सोडायला सज्ज झालो. तेव्हा आम्ही ५० जण आता एकमेकांना चांगले परिचयाचे झालेलो. त्यामुळे एकमेकांबरोबर फोटो काढण्याचा समारंभ झाला. त्या दिवशी मी ५-६ वेगवेगळे cameras एकाच वेळी हातात घेऊन फोटो काढले(त्यानंतर मला फुकट्या छायाचित्रकार समजून दहा दिवसात कुणीही मला कुठल्याही वेळी फोटो काढायला सांगायचा. विशेषत महेश-विभा जोडप्याचे बहुतांश कपल फोटो मीच काढले). मला एका गोष्टीच फार कौतुक वाटल जेव्हा एखादा ग्रुप बेस कॅम्प सोडतो तेव्हा युथ होस्टेलवाले इतके कौतुक करतात की अस वाटत की एवरेस्ट वर चाललोय. टाळ्यांच्या गजरात बाकी बॅचेस ने आणि युथ च्या स्टाफने आम्हाला निरोप दिला. सोबत टोकन ऑफ लव म्हणून अल्युमिनियम फोईल मध्ये २-४ चिक्की, १५-२० लिमलेट च्या गोळ्या, एक ग्लुकोस बिस्कीटचा पुडा, हे सामान दिले गेले. आमच आजच्या दिवसच डेस्टिनेशन होत ते ‘गुनालपानी’ कॅम्प. जे साधारण १० किलोमीटर दूर होत कसोलपासून. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आम्हाला बस ने जायचं होत.
अर्ध्यातासाने बस आली(हिमाचलच महामंडळ). मी, पंकज,अविनाश आणि २-३ जण सर्वांच्या rucksack टपावर ठेवायला गेलो. आम्ही ५० जण एकदम आत शिरल्याने एकदम ठाणे महापालिकेच्या वागळे डेपो च्या बसच्या गर्दीची आठवण झाली. ज्या रिकाम्या जागा होत्या तिकडे पहिले स्त्री वर्गाला बसायला दिले. आम्ही बस मध्ये अंताक्षरी चालू केली(तेव्हापासून माझे गाणे म्हणणे चालू झाले ते ट्रेकच्या शेवटपर्यंत चालू होते.) पण कंडक्टर मामानी मनाई केल्याने तिथेच आवरते घावे लागले. तासभराच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो, rucksack उतरवल्या. बस मध्येच आमचे ‘गुनालपानी’ चे गाईड महाशय भेटले. आम्ही उतरलो जिथे तो खरा घाट होता तिकडून सारपास दिसत होता पण त्यावेळी तो अशक्यप्राय वाटत होतं सर करायला.(केला पण हो) मग मी आम्ही हळूहळू मार्गक्रमणा करत निघालो. मी तेव्हापासून ‘जोशी ग्रुप’ बरोबर चालायचो नाही कारण प्रदीप मंदार प्रसाद यांना कायम पोहोचायची घाई असायची, मी हळूहळू थांबत थाबत ,रमत गमत कधी सोमण काका, कधी नेहा-कविता बरोबर, कधी पंकज-सोनू-दीपा बरोबर, कधी महेश-विभा अशा विविध ग्रुप बरोबर गप्पा मारत मारत, मैत्री वाढवत यायचो(कशी ते जोशी ग्रुपला माहित आहे). आम्ही साधारण ९ वाजता चालणे चालू केले होते. मी खर तर एक गोष्ट वाचकांना सांगतो की हिमालयाच्या निसर्ग सौंदर्याविषयी शब्दात लिहूच शकत नाही, मी बापजन्मात इतका सुंदर प्रदेश आणि निसर्ग पहिला नव्हता जो तेव्हा पाहिला. त्यामुळे मी फारसं वर्णन करणार नाही यापुढील लिखाणात निसर्गाच(तुम्ही जाऊन या आणि मग मला ५ मिनिट तरी बोलून दाखवा मानल तुम्हाला). ११ वाजता आमचा ब्रेक होता. आम्ही डोंगरावरील एका वैशित्य्पूर्ण घरात थांबलो, तिकडे टिपिकल हिमाचल प्रदेशातील कुटुंब राहत होते. तिकडल्या लोकांची परिस्थिती एकदम बेताचीच खर तर. एवढं निसर्गाने भरभरून दिल पण तरीही लोकांकडे फारशी संपत्ती वगेरे सापडत नाही. त्यांचे स्वभाव वैशिट्य म्हणजे ते लोक अत्यंत मनमिळाऊ, साधे, मदत करण्यात तत्पर असतात(विशेषत मुली). पाहुणचार हा त्यांना फार चांगला जमतो. सुमारे अर्ध्यातासाने आम्ही निघालो, रस्ता फार वेडावाकडा होता, बहुतांश भाग हा चढ होता. माझ्या महाराष्ट्रातील डोंगर दर्यात फिरायच्या आणि ट्रेक च्या अनुभवावरून मी एवढ नक्की सांगेन की हिमाचालची माती ही खूप भुसभुशीत आहे, पाय सहसा घसरत नाही, पाउल नीट आणि पूर्ण रोवल तर पाय मातीत व्यवस्थित रुततो, त्यामानाने आपल्या मराठी मातीत पाउल जास्त घसरते आणि उतारावर फार त्रास होतो. साधारण १.३० वाजता आम्ही लंच घेतला जो डब्यात भरून आणलेला. आम्ही जवळपास अर्ध अंतर कापलेल, अर्ध बाकी होत. ४ पर्यंत पोहोचणे हे टार्गेट होत. हिमाचल मधील तिकडली काही स्थानिक लोक एक छोटेखानी canteen ठेवायचे, जिथे Maggi, Egg Omlet-boiled egg, chocolates,etc वगेरे मिळायचं. फक्त दर जरा जास्त होते कारण त्यांना बाजारातून इतक्या उंचावर सामान घेऊन आणणे खर्चिक असायचे. मी आणि श्रीकांत ने सहज आम्लेट टेस्ट केल. बर होत. जेवण झाल्यावर, आम्ही परत मार्गक्रमणा चालू केली. थोडासा वेग मंदावलेला जेवण झाल्यावर.
साधारण ४ वाजता वेळेवर आम्ही ‘गुनालपानी’ ह्या पहिल्या कॅम्प वर १० किमी अंतर पार करून एकदाचे पोहोचलो. सारपास च्या मार्गावरील पहिला कॅम्प. अतिशय सुंदर जागा, समुद्रसपाटीपासून सुमारे ८००० फुट उंच. गेल्या गेल्या आम्हाला चहा दिला गेला, आम्हाला ५० जणांसाठी साधारण ७-८ टेंट अरेंज केलेले. २ स्रीेल वर्गाला आणि उरलेले आम्हा टोणग्याना. ५ वाजता आम्हाला Tomato Soup दिले गेले. तिकडल्या गाईड ने आम्हाला सांगितले की कोपर्यात एक पाण्याचा पाईप होता ज्यातून सतत २४ तास पानी वाहत असायचं ते आम्हाला सर्व गोष्टीना वापरायच होत. तिथे बारमाही नद्या असल्याने पाण्याचा काही तुटवडा नव्हता. मला २४ तास पानी सतत वाहत ठेवणे पटले नाही खरे(डोंबिवलीची सवय हो, लहानपणापासून शिकवलं पानी जपून वापरायच, शुक्रवारी येत नाही). मी त्यांना मजेत म्हणल म्हणल हा पाईप डोंबिवली पर्यंत पाठवा हो. त्यावर एकच हशा पिकला. तिकडे ५ वाजताच अंधार झालेला होता. ६.३० ला आम्हाला रात्रीचे जेवण दिले गेले. ८ वाजता कॅम्प फायर होती. ‘कोंबडी’ गाण मी २ दिवसापूर्वी म्हणल होत आणि ते अमराठी लोकांमध्ये लोकप्रिय केल होत(अजय अतुलने काहीतरी मानधन दिल पाहिजे मला, काय?). त्यामुळे पहिली फार्मायीश कोंबडी ची झाली. सगळे माझ्या गाण्यावर मनमुराद नाचले. मग मी अजून काही फास्ट बत वरची गाणी म्हणत आम्ही सगळे नाचत होतो. तेव्हा गुजराती ग्रुप मधील हेमलता उर्फ Happy, Jummi, Tapasvi यांनी सर्वाना गो उभे राहून गरबा करायची आयडिया दिली. त्यांनी त्यांच्या सेल वर गरब्याची गाणी लावली आणि सर्व नाचलो. फार कुणाला गरबा खेळणे जमत नव्हते, मी मात्र उंच पायांचा वापर करत वेगवेगळ्या स्टेप करत होतो. ते पाहून तिने मला बोलावले आणि सगळ्या ग्रुप लं मी आणि तिने गरब्याच्या काही स्टेप करून दाखवल्या. तरीही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जोशी ग्रुप मधील प्रदीप, गौरव हे टेंट मध्येच पथारी लाऊन पडले होते. त्यांनी यात सहभाग घेतला नाही(प्रदीप ने खानणे-झोपणे सोडून कशातच रस दाखवला नाहीच पुढे). शेवटी ९.३० ला कॅम्प फायर संपलं आणि रात्री Bournvita पिऊन आम्ही १० ला झोपलो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment