April 12, 2011

२५ मे –‘भंदक थाच

हा आमच्या सफरीतला शेवटचा कॅम्प होता. आम्ही हळूहळू पायथ्याशी वाटचाल करू लागलो होतो. आता चढ चढायचा नसल्याने मला जरा जड बॅग घेऊन उतरायला थोडस सोप पडत होत. आजचा प्रवास तसा जास्त होता, सुमारे ७-८ किमीचा होता. भंदक थाच’ कॅम्प ला युथ होस्टेल वाले भारताचे स्वित्झर्लंड म्हणतात, पण स्वित्झर्लंड पाहिलं नसल्याने मी तुलना करणार नाही. पण एवढ मात्र नक्की सांगू शकतो की इतर बाकी कॅम्प पेक्षा –‘भंदक थाच’ स्पॉट ला निसर्ग अफलातून होता. निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दान या प्रदेशात टाकल होत. अतिशय विस्तीर्ण अस हिरवगार माळरान आणि वर आम्ही सर् करून आलेला साक्षात हिमालय होता. आम्ही जेव्हा प्रवासाची सुरुवात भून्तर पासून केली तेव्हा छान आल्हाददायक वातावरण होते त्यानंतरचे सर्वात सुंदर वातावरण तेव्हा त्या वेळी होते. कदाचित आता आपल्याला यापुढे चालाव लागणार नाही अजून या भावनेने अजूनच छान वाटत होत. नेहमी आम्ही कुठल्याही कॅम्प वर आलो की पहिले आडवे व्हायचो थोडावेळ, पण तिथे काहीतरी धावाव,खेळाव, धमाल मजा मस्ती करावी अस वाटत होत सर्वानांच. योगायोगाने त्या कॅम्प साईट वर आम्हाला एक कापडी चेंडू मिळाला. मग आम्ही अबधुबी किवा शेकाशेकी खेळायचं ठरवल. महाराष्ट्र विरुद्ध बाकी राज्ये अशी गटविभागणी झाली. गुजराती बांधवांना चेंडूने शेकवून शेकवून आम्ही पुरते बेजार केले. खूप दिवसांनी धावल्या-पडल्या मुळे बालपणीच्या त्या खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान खेळ झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यात खेळता खेळता प्रसाद धडपडला आणि नेमका त्याच्या खिशातील त्याच्या मोबाईल वरच. त्याचा ७५ किलोचा देह (मी अंदाजेच सांगतोय, कमी जास्त किंबहुना जास्तच असाव)त्या मोबाईल वर पडला, हे लक्षात आल्यावर लगबगीने त्याने मोबाईल बाहेर काढला(एरवी माणूसही चेपला असता). सुदैवाने मोबाईल शाबूत होता(बघा नोकियाचे पीस किती धडधाकट असतात त्याचा अजून एक नमुना). मोबाईल काही चालू होईना, प्रसादच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंता उमटली पण त्या निमित्ताने नवीन मिळेल हा विचार त्याला सुखावत होताच. पण मजा अशी झाली त्याच्या मोबाईलची battery संपल्याने तो बंद होता, जेव्हा चार्जिंग चालू केल तेव्हा व्यवस्थित चालू झाला(आणि तो अजूनही वापरतोय तो पीस). नेहमीप्रमाणे सूप वगेरे झालेच. आमचे नेते सोमणकाका यांनी सर्वांना बोलावले आणि त्यांचे Contact details एका कागदावर लिहून द्यायला सांगितले आणि ते गोळा करायची जवाबदारी मी आणि प्रसादने उचलली. त्याचबरोबर ह्या ट्रेक मध्ये जमलेली सर्वांची मैत्री अशीच कायम राहावी आणि पुढेही सार्वजन एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी ओर्कुट आणि फेसबुकवर ‘रंगीन पांडा २०१०’ अशी Community काढायची ठरले आणि ती जवाबदारी अविनाशने उचलली. मग जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि त्या दिवशीची कॅम्प फायर जोरदार करायचे ठरले. साधारण ९ वाजता कार्यक्रम चालू झाला. तिकडे प्रकाशासाठी आम्ही एक कल्पना काढली, लाकडे न जळवता आम्ही सर्वांच्या Torches गोळा केल्या आणि डिस्को लाईट प्रमाणे त्या अरेंज करून छान पैकी वातावरणनिर्मिती केली. त्या दिवशी प्रत्येकाने almost काहीना काहीतरी कला सदर केली. सुरुवातीला कोळीनृत्य, गरबा मग सोनूच्या ग्रुपचे आधुनिक रामायणाचे नाटक, दीपाचे नृत्य,दक्षिण भारतीय मंडळीचे folk गायन, दोन्ही मांचे सुंदर आवाजातील गायन असा कार्यक्रम रंगत होता. मग लोकाग्रहास्तव मी ब्रेथलेस गाण परत एकदा सादर केल त्यादिवशी. त्या कॅम्प फायरला खुपच धमाल आली. ती रात्र कधीच संपू नये अस प्रत्येकाला मनोमन वाटत होत. पण वेळेच्या आणि जागेच्या मर्यादा पाळण तितकच महत्वाच होत. नेहमीप्रमाणे Bournvita पिऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो

२४ मे सारपास- बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता. सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो. वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसाद ने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.
सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घसरगुंडीसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मी काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतार एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात). मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज कृत्य केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कसोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.