September 9, 2012

दिवाळीचे बदलते स्वरूप


दिवाळी म्हणजे सणांची राणी. आनंदाचे उधाण. नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके, गोडधोड पदार्थ इत्यादी. हे झाल पारंपारिक टिपिकल समीकरण. या वर्षी एक मी प्रकर्षाने पाहिलं की दसरा होऊन १० दिवस झाले तरी दिवाळीच्या चाहुलीचा काही पत्ताच नाही. दिवाळी अवध्या १५ एक दिवसांवर आहे असे वाटतच नव्हतं. अचानक माझं मन flashback मध्ये गेलं. मी साधारण १०-१२ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. तेव्हाचं दिवाळीचं स्वरूप आणि आताचं यात काळानुरूप बराच फरक पडलाय. साधारण दसरा-दिवाळी एकाच महिन्यात येत असल्याने त्या महिन्याच्या सुरुवातीलाच घरातील बायका (विशेष सूचना-मी मध्यमवर्गीय दिवाळी बद्दल बोलतोय जिंदल, अंबानी, टाटा यांच्या नाही )पुरुषांना सांगून ठेवायच्या, "या महिन्याला किराणा जास्त लागेल, फराळाचे पदार्थ तयार करायचे आहेत". मग बायकांचे नंडेला, जावेला, सासुबाई इत्यादी 'फराळ मेकर' टीम ला फोन चालू व्हायचे, मग फराळाला मदतील ये असा निरोप एकमेकींना मिळायचा. दसरा झाला रे झाला की पोरांच्या सहामाही संपायची, आणि मग एखादा शनिवारी-रविवारी घरातील कर्ते पुरुष स.कु.स.प 'खरेदी' नावाचा सोहळा पार पाडायला बाहेर पडायचे. बरीच दुकानं हिंडून, कैक तास रेंगाळत एकदाचे  हवे तसे कपडे मिळाले, आणि मुलांसाठी फटाके घेतले की कुटुंबाच्या आग्रहाखातर हॉटेलातच रात्रीचे जेवण होई. मग दिवाळीच्या सुट्टीत पिस्तुल घेऊन लहानगे फटाके फोडायला चालू करीत. रोज संध्याकाळी फटाक्यांचे आवाज सर्रासपणे एकू येत. फोनवर ठरल्याप्रमाणे बायकांचा गोतावळा जमे, आणि चालू होई फराळाची तयारी. कुठे भाजणी भाजल्याचा वास, कुठे नारळ खवल्याचा आवाज, कुठे बेसन भाजतानाचा खमंग वास येई तर कुठे बायका सोर्यातून चकलीचे आकार पडताना दिसत. मग बायकांमध्ये तुझी चकली बिघडली का ? माझी बिघडली, माझ्या करंजीच्या सारणात साखरच कमी पडली तुझ्या पडली का ? वगेरे चर्चा ऐकू येत. तेव्हा 'रेडीमेड फराळाचे आयटम' हा प्रकार अस्तित्वात नव्हताच. मग डायरीतील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र- मैत्रिणींना दिवाळीचे ग्रीटिंग पाठवण्यासाठी पत्ते काढले जायचे. मग बाहेरगावच्या लोकांना साधारण आठवडाभर आधी ग्रीटिंग, आणि ख्याली खुशाली विचारणारे पत्र पोस्टाने पाठवले जाई, त्याच बरोबर आलेले ग्रीटिंग पाहून एक विलक्षण समाधान चेहऱ्यावर झळकायचे. ती ग्रीटिंग वर्षानुवर्षे  जतन केली जायची .  घरातील नोकरदार पुरुषांना दिवाळीची विविध गिफ्ट्स मिळायची. त्याचं एक आगळंच कौतुक असायचं.

साधारण नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री लवकर जेवणं व्हायची., जेणेकरून लवकर झोपून पहाटे लवकर उठता येईल. साधारण पहाटे  ३ च्या सुमारास उठून तयारीची लगबग चालू व्हायची. सुगंधी तेलाच्या वाट्या , आणि उटणी तयार असायची. मग घरातील पुरुष मंडळीना बायका तेल लावायच्या, आणि उटण आणि मोती साबणाने अभ्यंग स्नान व्हायचे. मग शास्त्राप्रमाणे  देवाची पूजा करून फराळाचा नेवेद्य दाखवला जायचा. मग फराळाच्या विविध पदार्थांचे डबे बाहेर काढले जायचे, मग एका मोठ्या ताटात लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, चिवडा इत्यादी मांडले जायचे. मग अशी एखाद दोन ताट शेजारी पाजारी दिली जायची आणि त्यांच्याकडून पण एखाद दुसरे ताट यायचे. खाऊन झाल की फटक्यांची पिशवी आणि उदबत्ती  घेऊन आबाल वृद्ध गच्चीत किवा मोकळ्या जागेत फटाके उडवायला जायची. पहाटेपासून फटक्याचा nonstop आवाज थेट दुपारपर्यंत असायचा.  मग विशेष जेवण न करता तेच पदार्थ जेवताना खाल्ले जायचे. दुपारी वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळची लक्ष्मीपूजनाची तयारी चालू व्हायची, संध्याकाळी ६.३० नंतर लक्ष्मीपूजन व्हायचे. नंतर परत संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फटक्यांची आतषबाजी असायची. रात्री आकाशात रॉकेट उडतानाचे दृश्य विहंगम वाटायचे.  

आताच्या काळात हे टिपिकल schedulde बरेचसे बदलले आहे. विशेष fact म्हणजे पूर्वी फराळाचे पदार्थ दिवाळीला एकदाच केले जायचे आणि खाल्ले जायचे, हल्ली १२ महिने चकली चिवडा करंजी इत्यादी अगदी 'easily available' असल्याने वर्षभर खाल्ले जाते त्यामुळे त्याचे glamour नाहीसे झाले आहे.  सध्या सर्वाना जाणवणारा एकच problem, तो म्हणजे वेळेचा अभाव, नोकरदार बायकांना फराळ करायला वेळ नसल्याने, रेडीमेड फराळाच्या उद्योगाला सुगीचे दिवस आले  आहेत. त्यामुळे मायेच्या हातच्या फराळाची चव चाखायला मिळत नाही. कपड्याची खरेदी पण एरवी वर्षभर होतच असल्याने, दिवाळीच्या खरेदीचे तितकेसे आकर्षण राहिलेले नाही.  वाढत्या महागाईने जरा खरेदीला कात्री लागल्याचे स्वरूप पहावयास मिळते. 'दिवाळी पहाट' हा एक आगळाच कन्सेप्ट खासकरून मुंबई पुण्यात चालू झालेला दिसतो. डोंबिवली मध्ये दिवाळीच्या पहाटे 'फडके रोड' वर सगळी तरुणाई एकत्र जमते. सगळे मित्र मैत्रिणी, आप्तेष्ट जमून एकमेकांना शुभेच्छा देतात. हाच कित्ता  ठाण्यात राम मारुती रोड, पुण्यात सारसबाग, दादरला पार्कात गिरवला जातो. परवा एक मजेदार किस्सा पाह्यला मिळाला, एक शाळकरी मुलगा त्याच्या मित्राला विचारत होता, की “अरे ते फडकेला जातात ना त्यादिवशी कुठला वार आहे?” हे जितक हास्यास्पद आहे तितक कीव करण्यासारखं आहे. पूर्वी खरेदी वर्षातून कधीतरीच होई, आणि दिवाळी त्यातील एक मुख्य निमित्त होते, हल्ली वर्षभर काहीना काहीतरी कपड्यांची खरेदी होतच असल्याने त्याचं पण नाविन्य राहिलेलं नाही. फटाक्यांच प्रमाण पण लक्षणीय कमी झालेले आहे ही एक चांगली बाब. अभ्यंग स्नाना मध्ये कृत्रिम creams, moisturizers, cosmetics ची भर पडली. SMS, Email  मुळे ग्रीटिंग ची देवाण घेवाण कमी झाली. एका आनंदाच्या सणाचे बाजारीकरण झालेले आहे. कुठेतरी सणाचे धार्मिक महत्व लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. सात्विकता कमी होऊन सणाचे भडक बाजारीकरण झालेले आहे. शेवटी काळानुसार enjoyment च्या ज्याच्या त्याच्या पिढीच्या कन्सेप्ट मध्ये फरक पडतोच म्हणा. चालायचंच ‘कालाय तस्मै नमः’ .म्हणायचं   .  

April 12, 2011

२५ मे –‘भंदक थाच

हा आमच्या सफरीतला शेवटचा कॅम्प होता. आम्ही हळूहळू पायथ्याशी वाटचाल करू लागलो होतो. आता चढ चढायचा नसल्याने मला जरा जड बॅग घेऊन उतरायला थोडस सोप पडत होत. आजचा प्रवास तसा जास्त होता, सुमारे ७-८ किमीचा होता. भंदक थाच’ कॅम्प ला युथ होस्टेल वाले भारताचे स्वित्झर्लंड म्हणतात, पण स्वित्झर्लंड पाहिलं नसल्याने मी तुलना करणार नाही. पण एवढ मात्र नक्की सांगू शकतो की इतर बाकी कॅम्प पेक्षा –‘भंदक थाच’ स्पॉट ला निसर्ग अफलातून होता. निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दान या प्रदेशात टाकल होत. अतिशय विस्तीर्ण अस हिरवगार माळरान आणि वर आम्ही सर् करून आलेला साक्षात हिमालय होता. आम्ही जेव्हा प्रवासाची सुरुवात भून्तर पासून केली तेव्हा छान आल्हाददायक वातावरण होते त्यानंतरचे सर्वात सुंदर वातावरण तेव्हा त्या वेळी होते. कदाचित आता आपल्याला यापुढे चालाव लागणार नाही अजून या भावनेने अजूनच छान वाटत होत. नेहमी आम्ही कुठल्याही कॅम्प वर आलो की पहिले आडवे व्हायचो थोडावेळ, पण तिथे काहीतरी धावाव,खेळाव, धमाल मजा मस्ती करावी अस वाटत होत सर्वानांच. योगायोगाने त्या कॅम्प साईट वर आम्हाला एक कापडी चेंडू मिळाला. मग आम्ही अबधुबी किवा शेकाशेकी खेळायचं ठरवल. महाराष्ट्र विरुद्ध बाकी राज्ये अशी गटविभागणी झाली. गुजराती बांधवांना चेंडूने शेकवून शेकवून आम्ही पुरते बेजार केले. खूप दिवसांनी धावल्या-पडल्या मुळे बालपणीच्या त्या खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान खेळ झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यात खेळता खेळता प्रसाद धडपडला आणि नेमका त्याच्या खिशातील त्याच्या मोबाईल वरच. त्याचा ७५ किलोचा देह (मी अंदाजेच सांगतोय, कमी जास्त किंबहुना जास्तच असाव)त्या मोबाईल वर पडला, हे लक्षात आल्यावर लगबगीने त्याने मोबाईल बाहेर काढला(एरवी माणूसही चेपला असता). सुदैवाने मोबाईल शाबूत होता(बघा नोकियाचे पीस किती धडधाकट असतात त्याचा अजून एक नमुना). मोबाईल काही चालू होईना, प्रसादच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंता उमटली पण त्या निमित्ताने नवीन मिळेल हा विचार त्याला सुखावत होताच. पण मजा अशी झाली त्याच्या मोबाईलची battery संपल्याने तो बंद होता, जेव्हा चार्जिंग चालू केल तेव्हा व्यवस्थित चालू झाला(आणि तो अजूनही वापरतोय तो पीस). नेहमीप्रमाणे सूप वगेरे झालेच. आमचे नेते सोमणकाका यांनी सर्वांना बोलावले आणि त्यांचे Contact details एका कागदावर लिहून द्यायला सांगितले आणि ते गोळा करायची जवाबदारी मी आणि प्रसादने उचलली. त्याचबरोबर ह्या ट्रेक मध्ये जमलेली सर्वांची मैत्री अशीच कायम राहावी आणि पुढेही सार्वजन एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी ओर्कुट आणि फेसबुकवर ‘रंगीन पांडा २०१०’ अशी Community काढायची ठरले आणि ती जवाबदारी अविनाशने उचलली. मग जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि त्या दिवशीची कॅम्प फायर जोरदार करायचे ठरले. साधारण ९ वाजता कार्यक्रम चालू झाला. तिकडे प्रकाशासाठी आम्ही एक कल्पना काढली, लाकडे न जळवता आम्ही सर्वांच्या Torches गोळा केल्या आणि डिस्को लाईट प्रमाणे त्या अरेंज करून छान पैकी वातावरणनिर्मिती केली. त्या दिवशी प्रत्येकाने almost काहीना काहीतरी कला सदर केली. सुरुवातीला कोळीनृत्य, गरबा मग सोनूच्या ग्रुपचे आधुनिक रामायणाचे नाटक, दीपाचे नृत्य,दक्षिण भारतीय मंडळीचे folk गायन, दोन्ही मांचे सुंदर आवाजातील गायन असा कार्यक्रम रंगत होता. मग लोकाग्रहास्तव मी ब्रेथलेस गाण परत एकदा सादर केल त्यादिवशी. त्या कॅम्प फायरला खुपच धमाल आली. ती रात्र कधीच संपू नये अस प्रत्येकाला मनोमन वाटत होत. पण वेळेच्या आणि जागेच्या मर्यादा पाळण तितकच महत्वाच होत. नेहमीप्रमाणे Bournvita पिऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो

२४ मे सारपास- बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता. सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो. वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसाद ने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.
सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घसरगुंडीसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मी काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतार एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात). मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज कृत्य केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कसोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.

July 25, 2010

23 मे- तिलालोटणी

सकाळी उठल्यावर आमच्यातील काही बायकांनी रात्री अस्वलं आल्याचे सांगितले मला ते काही खर वाटलं नाही, आम्ही जोशी मंडळीनी आवरल आणी पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालो. आजचा प्रवास ११००० फुट झिरमि ते १२५०० फुट तिलालोटणी असा होता, सारपास पासून आता आम्ही फक्त १ कॅम्प दूर होतो. जसजस वर जात होतो तसतसा प्रवासाचा थकवा लवकर जाणवत होता, आधी ज्या वेगाने, किवा सलग जेवढा वेळ मी चालायचो, तेवढ या प्रवासात जमल नाही, कारण ऑक्सिजन पटली कमी होत असल्याने श्वसन करणे थोडे कठीण असते. हवेत पण कमालीचा गारवा होता, झिरमि सोडल्यावर हिमालयीन वातावरणाचा खरा फील मला आला. जसजसे वर जात होतो तसतसा सारपास जवळ जवळ येऊन आम्हाला खिजवत होता. आजूबाजूचे इतर सुळके आता खुजे वाटत होते, पण सारपास पाहायला अजूनही मान वर करावी लागतच होती(उगाच त्याला सारपास म्हणत नाहीत). बरेच चढ उतार पार करत ४ च्या सुमारास ‘तिलालोटणी’ कॅम्प वर पाउल टाकले. “अब हम मंजील के बहुत करीब थे”. तिलालोटणी कॅम्प हा उंच टेकडीवर उभा केलेला होता, आजूबाजूला नुसती हिरवळच होती, ती साईट मला (डिस्कवरी वर बघितलेल्या)लेह-लडाख च्या वातावरणाची आठवण करून देत होती. खडकाळ जमीन, त्यावरील अप्रतिम हिरवळ, उंच पर्वतसुळके, आणी टिपिकल हिमालयीन मंगोलियन वंशाच्या लोकांची वस्ती, दगडाच्या चीपोऱ्या रचून बांधलेले त्यांचे विशिष्ट मंदिर, सुसाट वेगाने वाहणारा वारा, आणी त्यातील झोंबणारा गारवा, एक वेगळेच अदभूत विश्व होते. तेथील गाईड ने आम्हाला त्या मंदिराच्या दिशेकडे न जाण्यास सांगितले. आम्ही जोशी ग्रुप ने मग एक फोटो सेशन केले. तिलालोटणी वर एक त्रास म्हणजे शौचालय हे एका भल्यामोठ्या उताराच्या पायथ्याशी होते,(जवळपास माझ घर ते बोडस कार्यालय एवढ अंतर). तो चढ चढणे फारच त्रासदायक काम होते. गाईड ने आम्हाला सूचना दिली, त्या रात्री कॅम्प फायर होणार नाही, कारण सारपास लं निघायला त्या दिवशी पहाटे २.३० ला उठायचे आहे. त्या दिवशी हिमालयीन थंडी ने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही पोहचलो तेव्हाच १० डिग्री तापमान होत. रात्री कदाचित २-३ पर्यंत सहज गेल असेल, तोंडातून नुसत्या वाफा निघत होत्या त्या दिवशी. खर तर इतके दिवस माझ्या जड सामानाच मुख्य कारण म्हणजे पुण्याहून आणलेले भलेमोठे थंडीचे कपडे, पण आतापर्यंत एवढी विशेष थंडी न जाणवल्याने मी फक्त jacket वर होतो. पण त्या दिवशी मला स्वेटर, अजून एक jacket, मफलर(जे आतापर्यंत माझ असलेल मंदार वापरत होता, ते मे आज मागून घेतल). एवढे वस्त्रालंकार परिधान करून रात्री स्लीपिंग बॅग मध्ये blanket घेऊन झोपलो.

२४ मे सारपास- बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता.

सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो. वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसादने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.

सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घास्र्गुंदिसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मे काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतर एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात).

मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज गोष्ट केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कासोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.

July 22, 2010

२२ मे- झिरमी

काल जरा सुखाने झोपल्याने सकाळी जरा उशिरा जाग आली, प्रसाद ने फटके मारून उठवलं. उठल्यावर पाहतो तर आमचे अप टू देट मंदार शास्त्री साहेब आवरून तयार होते. मग पटापट मे आवरून टेंट साफ केला. नाश्ता केला आणी डब्यात जेवण घेतलं. ७.३० ला कुलकर्णी सरांना आणी ‘फुआलपानी’ ला जय महाराष्ट्र केला. आजचा प्रवास ९५०० फुट फुआलपानी ते ११००० फुट झीरमी असा होता. आम्ही जसजसे उंच उंच चढत होतो तसा Altitude sickness ची काही लक्षण काही जणांमध्ये दिसायला लागली. कानडी मंडळीतील राजलक्ष्मी हिला पित्त होऊन उलटी चा त्रास झाला मग त्या दिवसापुरता बाईनी पोर्टर घेतला. ‘हैप्पी’ लं सुद्धा थोडफार मळमळत होतच. तसेच सर्वात जेष्ठ अश्या मा-१ आणी २ यांना पायदुखीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा आमच्यातील वैद्य श्रीकांत जोशी याने सर्वाना वैद्यकीय उपचार करून दिले आणी सर्वांचे आशीर्वाद मिळवले.(नंतर डॉक्टर साहेबाना फार डिमांड आली).

वाटेत आज प्रथम आम्हाला पर्वत शिखरावरून घसरत आलेला बर्फ एका सपाट जागी साचलेला मिळाला. मग बर्फ दिसल्यावर सर्वाना चेव आला. २ गात कडून एकमेकांना बर्फाचे गोळे करून मारायचा खेळ चालू झाला. आमच्यातील श्रीकांतराव जरा जास्तच उत्साह दाखवत खेळत होते(तसा तो प्रचंड शांत थोडासा संथ आहे.) त्यात गम्मत अशी झाली कि खेळता खेळता श्रीकांतच्या डोक्यावरचा गॉगल पडला आणी साहेबाना निघायच्या वेळी आठवल कि आपला गॉगल हरवला. मग सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. मी जरा नेहमीप्रमाणे तिरक डोक चालवून भलत्या ठिकाणी शोध घ्यायला लागलो, तेव्हा मला बाकीच्यांनी ‘तिकडे पडण शक्यच नाही गॉगल’’ असा शेरा मारला, आणी एका दगडाच्या थोड आतमध्ये मला काहीतरी कळ्या रंगाची वस्तू दिसली. तो नेमका श्रीकांतचा गॉगल होता. तोपर्यत सर्वानी आशा सोडून पुढे वाटचाल चालू केली होती, तेवढ्यात मी गाजावाजा न करता शांतपणे श्रीकांतच्या हातात(माज दाखवत) गॉगल टेकवला(त्यानंतर सहसा त्याने माझी खेचली नाही).

त्या दिवशीची चढण ४५ अंशाची सरळ होती, आणी जेवण झाल्यावर चढायला फार कठीण जात होते(आणी बर्फात खेळल्याने सर्वांचा बोका गार झालेला). आज सकाळी ट्रेक चालू करताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पावसाळी ट्रेकचा अनुभाव्पण मिळाला. आधी सांगितल्याप्रमाणे इथे हवा तासागणिक बदलते. त्यामुळे लगेच थोड्यावेळात उन येऊन आम्ही चक्क ३ इंद्रधनुष्य एकाच वेळी पाहू शकलो. नुकत्याच पावसामुळे प्रसन्न झालेली हिरवळ आणी पायाखालच्या गवतावर आणी झुडुपाच्या पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे पाण्याचे थेंब मला चढ पार करायला उर्जा देत होते. वर पाहिलं कि दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे, अभ्राच्छादित आकाश, हिरवीगार घनदाट झाडी असे सौंदर्य म्हणजे एक अप्रतिम सुखाची अनुभूतीच होती.

एकदाचे ४ वाजता झीरमी ला पोहोचलोच. आता मला जरा जमिनीपासून बरच वरती आल्याचा फील आला होता. तिकडले कॅम्प लीडर हे सुद्धा आपले मराठी गृहस्थ नाशिकचे श्री मुलमुले म्हणून होते. त्यांनी आमचे स्वागत केले. संध्याकाळी नाश्त्याला चहाबरोबर गरम गरम बटाटे वडे होते. झीरमी सुद्धा अत्यंत सुरेख जागा होती. त्यात कॅम्प लीडरने सांगितले कि इकडे रात्री अस्वलं येतात त्यामुळे रात्री कॅम्प फायर ही टेंट मध्येच होईल. जेवण झाल्यावर आमच्या जोशी गटातील फक्त मीच कॅम्प फायर ला जातीने हजर होतो. प्रत्येकाने आपापली कलाकारी करून दाखवली, मी सोनुपाजीच्या(ये मुंडा सबसे ज्यादा छा गया ट्रेक मे) आग्रहावरून मी ‘मल्हारवारी’ म्हणले. स्वत मुलमुले साहेबांनी गाण्याची काही अदाकारी पेश केली. त्या दिवशी सुद्धा कॅम्प फायर ला उपस्थिती मोजकीच होती. रात्री दुध पिऊन शांत चित्ताने मी रात्री ९.३० वाजता झोपलो

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

21 मे- फुआलपानी

आमच आजच्या दिवसाच टार्गेट ते म्हणजे ९५०० फुट उंचावरील ‘फुआलपानी कॅम्प’. सकाळी सगळ वेळेत आटपून, टेंट वगेरे साफ करून आम्ही नाश्ता केला, त्या दिवशीच जेवण डब्यात भरल, आणि सकाळी ७.३० रांगेत उभे राहिलो. सेनापती सोमण काकांनी आमच्या ग्रुप च्या वतीने कॅम्प लीडर आणि त्यांच्या आचारी वर्गाचे आभार मानले आणि त्यांना अलविदा करून फुआलपानी कडे रवाना झालो. वास्तविक वळण हे फार नागमोडी होते, नेहमीप्रमाणे आमचे जोशी ग्रुप चे शिलेदार पुढे गेले आणि मी रमत गमत चालू लागलो. वास्तविक माझ जड सामान मला त्रास देत होतच, आदल्या रात्री मी ‘आयोडेक्स’ लावल होत आणि वैद्य श्रीकांत कडून ‘रिली स्प्रे’ खांद्याला मारून घेतला(हे रोजच चालू होत, पण कुणाची मदत घ्यायची नाही हा माज आडवा आल्याने कुणाला मदत मागितली नाही आणि तसच निभावल).

वास्तविक माझा उजवा खांदा निखळला असल्याने, चढावर खूप ताण यायचा, तेव्हा श्रीकांत आणि बाकी जोशी मंडळीनी मला पोर्टर घायची सूचना केली(आमच्या ग्रुप मधील कविताने घेतलेला असल्याने) आणि माझी खिल्ली उडवायला लागले, पण पुण्याचे रक्त अंगात असल्याने आणि चिकाटी असल्याने मी दुर्लक्ष केल(हे चिडवण रोज असायचं श्रीकांतच पण त्याला काही दाद दिली नाही मी). वास्तविक ते जंगल म्हणजे फक्त सूचीपर्णी वृक्षांची दाटी होती, अत्यंत गर्द आणि घनदाट. त्या वाटेत मी अर्जीन्दार उर्फ सोनू बरोबर मराठा आणी शिखांचा इतिहास, शिवाजी महाराज, शीख पद्धती वगेरे वर तात्विक चर्चा केली चालता चालता. मध्येच गुजराती मंडळीनी मला त्यांच्या खाण्याच्या ब्रेक मध्ये सामील व्हायचा आग्रह केला आणी मी काही नमकीन पदार्थ त्यांच्याबरोबर खाल्ले.

साधारण ४ च्या सुमारास आम्ही फुआलपानी स्पॉटला पोहोचलो. वास्तविक तो कॅम्प म्हणजे १ टेकडीच होती. टेकडीवर एक मोठा उतार आणी उतर संपल्यावर लगेच आमचा टेंट. टेंट ची रचना पण फार विचित्र होती. फुआलपानी चे वैशिट्य म्हणजे इथे सर्व गोष्टीना ट्रेकिंग करावे लागते. जेवण,पाण्याचा नळ, अगदी नैसर्गिक विधिना सुद्धा. प्रत्येक वेळेला चहा,सूप,जेवणासाठी सुद्धा मोठा चढ चढून जावे लागत असे. या कॅम्पचे मुख्य आपला ‘मराठी माणूस’ श्री कुलकर्णी म्हणून होते. वास्तविक ते मुंबईतील बांद्र्याचे पण कायमचे दिल्लीत स्थायिक झालेले. त्यांनी मराठी मंडळी पाहून आपणहून आमच्या टेंट मध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्या.(तेव्हा आमचा राज ठाकरे वाद नेमका टेंट मध्ये चालू होता, मी राजसाहेबांचा एकांडा शिलेदार मंदार-गौरव-प्रसाद च्या आरोपाना सामोरा जात होतो). त्यांनी दिल्लीत ही खूप मराठी माणस राहत असल्याचे सांगितले अगदी निर्भयपणे त्यामुळे ऐकून बर वाटल.

त्या दिवशी कॅम्प फायर ही अंधारात करावी लागणार होती ती पण एका टेकडीवर(तिथे पण ट्रेकिंग). आमच्या जोशी मंडळीनी काही रस दाखवला नाही आणी जेवण झाल्यावर एकजात सगळे आडवे झाले, पण मी गाणी वगेरे म्हणण्यात पहिल्यापासून अग्रेसर असल्याने मी एकटाच गेलो. किर्र काळोख असल्याने आणी त्यादिवशी जरा दगदग झाल्याने फार कमी मंडळी कॅम्प फायरला आली. तिकडे मी हैप्पी च्या आग्रहावरून शंकर महादेवन चे ‘ब्रेथलेस’ गाण सदर केलं. वास्तविक ९५०० फुटावर इतक्या विरळ ऑक्सिजन असताना सतत ३-४ मिनिट गाणे हे मोठे आव्हान होते आणी ते मी यशस्वीपणे पेलले. त्याचे फार कौतुक झाले(म्हणून शेवटच्या दिवशी पण मला सर्वांसमोर गायचा आग्रह झाला). तिकडे आम्ही कुठली जुनी-पुराणी गाणी आठवून किर्र काळोखात म्हणत होतो आणी थंडीत त्याची मज्जा अजूनच येत होती. आणी आनंद याने रेहमान च्या ‘वंदे मातरम’ ने केला आणी प्रसन्न मनाने झोपलो.